*एका दिवसात तलाव्यात 43 दशलक्ष घनफूट पाणी आले - वैभव दादा पाटील*
ज्याठिकाणी 65 मिलिमीटर पाऊस पडतो त्या ठिकाणी अतिवृष्टी जाहीर केली जाते मात्र 29 जून रोजी एका तासात सर्वसाधारण 115 मिलिमीटर पाऊस पडूनसुद्धा अतिवृष्टीचा फटका काही अपवाद वगळता कोठेही बसलेले दिसत नाही ज्या ठिकाणी पाणी साठले त्याठिकाणी अतिक्रमण किंवा रस्त्याचे काम चालू असल्यानेच हा प्रकार घडला होता. विटा नगरपरिषद ही स्वच्छतेच्या बाबतीमध्ये भारतात अव्वल आहे आपल्या गावात रोजच्या रोज कचरा घरोघरी जाऊन उचलला जातो तसेच रोजच्या रोज गटारी साफ करत असल्याने गावातील सर्व गटारे स्वच्छ असलेणेच एवढ्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसाचे पाणी गटारातून थेट विट्याच्या नैऋत्य बाजूला असलेल्या तलावात पोहोचले या तलावात विट्यातील सर्व पाणी जमा होते या तलावाची क्षमता 93 दशलक्ष घनफूट आहे मात्र एका तासाच्या पावसाने या तलावात एकदम पाणी आले एवढे पाणी जमा होण्यासाठी टेंभू योजनेचे 14 दिवस पाणी चालू असावे लागते इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनसुद्धा कोणाला याची तीव्रता जाणवली नाही याचे सर्व श्रेय विटा नगरपरिषदेला व सफाई कामगारांना जाते. एवढी मोठी विधारक परिस्थिती होऊन सुद्धा कोणालाही याचा त्रास झाला किंवा जाणवला सुद्धा नाही याचा मला अभिमान वाटतो असे प्रतिपादन वैभव दादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले यावेळी वैभव सुर्यवंशी, मानसिंग सूर्यवंशी व रोहित सूर्यवंशी उपस्थित होते